किनगावराजा दि.१७(प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या ग्राम उमरद येथील गावठानच्या रोहित्राची दुरावस्था झाली असून.यामुळे होत असलेल्या विजेच्या लपंडावास ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-17-at-15.12.40-768x1024.jpeg)
येथील झोपडपट्टी जवळील असलेले हे गावठाणातील रोहितत्राचे सात ते आठ महिन्यापासुन केबल खराब आहे ,फ्युज वारंवार जातात , महावितरण कडे तक्रार देउन सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे . त्यामुळे ग्राहकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे , झोपडपट्टी वरील गावकर्यांच्या वतीने किनगावराजा महावितरणाने नविन केबल सर्विस टाकण्यात यावे ,व फ्युज टाकण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे .