शेगाव : प्रतिनिधी. – डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरनाचा कित्तेक वर्षा पासून प्रलंबित असलेला विषय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलना मुळे मंजूर झाल्या असल्या कारणाने.मातंग समाज बांधवा मध्ये उत्सवाचे वातावरण आहे.
त्या निमित्याने स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांचा समाज बांधवा कडून ठीक ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. शेगाव शहरातील डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरण करण्यात यावे.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-13-at-04.31.01.jpeg)
करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना कडून सातत्याने मांगणी होत असताना. देखील नगर परिषद प्रशासन या प्रकरना कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करित आहे असा आरोप करित स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे 28 जुलै रोजी नगर परिषदे समोर उपोषण मांडले जो पर्यंत स्मारक सौंदर्यीकरण होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला असल्याने नगर परिषदेला जग येऊन डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरण नगर परिषदेच्या येण्याऱ्या सर्वसदारण सभे मध्ये ठेऊन ठराव मंजूर करू
अशे लेखी आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कळून 30 जुलै रोजी आश्वासन पत्र घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरनाचा मार्ग मोकळा झल्याने मातंग समाजा मध्ये जलोष होत आहे.
त्या निमित्याने समाज बांधवा कडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या सत्कार समाज बांधवा कडून ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला.